विश्व शक्तीशी संपर्क साधून उच्च रक्तदाबाचा त्रास बरा करा

विश्व शक्तीशी संपर्क साधून उच्च रक्तदाबाचा त्रास बरा करा

रक्तदाब काय आहे?

हृदयाकडून शरीराला रक्तपुरवठा करणा-या क्रियेदरम्यान जो दाब निर्माण होतो त्याचे मोजमाप म्हणजे रक्तदाब होय. रक्तप्रवाहाला किती प्रतिकार होतो याचेही हे मोजमाप आहे. जेव्हा तुमचा रक्तदाब ठरलेल्या स्तरापेक्षा जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा त्याला उच्च रक्तदाब म्हणू शकतो.

उच्च रक्तदाबाची प्राथमिक पातळीवर लक्षणे आढळत नसल्याने हा आजार केव्हा जडतो याची चाहूलही लागत नाही. उच्च किंवा कमी पातळीमुळे व्यक्तीच्या आरोग्याला गंभीर हानी होऊ शकते आणि स्ट्रोक, मज्जातंतू, डोळे, मूत्रपिंड आणि इतर अवयवांना होणारे नुकसान यांसह हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात म्हणून उच्च रक्तदाबावर त्वरित नियंत्रण मिळवणे महत्वाचे आहे.

उच्च रक्तदाबाचे प्रकार:

  1. प्राथमिक उच्च रक्तदाब
  2. दुय्यम उच्च रक्तदाब

रक्तदाबाच्या मोजमापाचे वाचन दोघांचे संयोजन असते : पहिले हृदयाच्या दोन ठोक्या दरम्यान जेव्हा हृदय विश्रांती घेत असते आणि दुसरे जेव्हा हृदय प्रत्यक्ष रक्त बाहेर ढकलत असते.

उच्च रक्तदाबामुळे कोणत्या पेशी प्रभावित होतात?

लठ्ठपणा आणि मीठाच्या संवेदनशीलतेमुळे तसेच पेशींच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाब होतो हे अगदी स्पष्ट आहे. रक्तवाहिन्यांचा समावेश असलेल्या गुळगुळीत स्नायू पेशी आणि एंडोथेलियल पेशी ही पहिली जीवितहानी आहे.

उच्च रक्तदाबाची लक्षणे:

  • डोकेदुखी/चक्कर येणे
  • श्वास कमी होणे/छातीत दुखणे
  • नाकातून रक्त येणे
  • सुस्ती

मानव गुरुंच्या अनुसार, लोकांना उच्च रक्तदाबासारख्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो जेव्हा त्यांचा विश्व शक्तीच्या कायम जवळपास असूनही तिच्याशी संपर्क तुटतो.

मग, उच्च/निम्न रक्तदाबावर कायमस्वरुपी उपचार शक्य आहे ?

होय, हे निश्चितच शक्य आहे! जेव्हा व्यक्ती विश्व शक्तीच्या संपर्कात येतो, उच्च रक्तदाबासारख्या आरोग्य समस्या सहजपणे ब-या होतात.

विश्व शक्ती काय आहे?

सगळ्या धर्मातील शास्त्रांमध्ये देवाबद्दल सांगितले आहे. तो एकमेव आहे ज्याला ना निर्माण करता येते ना नष्ट करू शकतो. तो जन्माला आलेला नाही आणि कधीही मृत्यू होणार नाही. तो सर्वोच्च आहे. देव/परमेश्वर विश्वात सगळीकडे आहे परंतु आपण त्याला पाहू शकत नाही.

या विश्वात एक अद्वितीय शक्ती आहे तिला आम्ही विश्व शक्ती म्हणतो. ही विश्व शक्तीसुद्धा विश्वात सर्वत्र आहे परंतु आपण तिला पाहू शकत नाही.

देव आणि विश्व शक्तीची वैशिष्ट्ये सारखीच आहे. मग आपण देवाला विश्व शक्ती म्हणून का संबोधत नाही?

विश्व शक्ती चैतन्य शक्ती आहे जी कायम आपल्या सभोवताली असते. आपण विश्व शक्तीला वेगवेगळ्या नावाने ओळखतो जसे की, ‘प्राणशक्ती’, किंवा वैश्विक ऊर्जा इत्यादी.

तुम्ही विश्व शक्तीशी कोठे संपर्क साधू शकता?

विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मंदिर, मशीद, चर्च किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळी जाण्याची आवश्यकता नाही. आपण ज्या स्थानावर जास्तीत जास्त वेळ घालवतो ते स्थळ महत्वाचे आहे.

आपण जवळपास दिवसातील 10 ते 12 तास आपल्या घरी आणि 8 ते 10 तास आपल्या कार्यस्थळी घालवतो. म्हणजे आपण दिवसाच्या 24 तासापैकी 20 ते 22 तास आपल्या घरी आणि कार्यस्थळी या दोन ठिकाणी घालवतो. म्हणून या दोन स्थळावर आपल्याला विश्व शक्तीशी संपर्क साधता येतो.

तुम्ही विश्व शक्तीच्या संपर्कात कसे येऊ शकता?

मानव गुरू त्यांच्या दिव्य ज्ञानाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विश्व शक्तीशी संपर्क साधण्यासाठी मदत करतील.

वर्ष 2000 पासून, लाखो कुटुंब याचा अनुभव घेत असून आनंदमय जीवन जगत आहेत.

याचे काही वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे का?

विश्व शक्तीचे विशिष्ट कंपन तरंग असतात. ‘9’ हा अंक विश्व शक्तीचा उच्च स्तरीय वैशिष्ट्यपूर्ण कंपन तरंग आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात. व्यक्ती ज्या ठिकाणी राहतो/कार्य करतो त्याची सुद्धा उर्जा असते जिचे काही कंपन तरंग असतात.

जेव्हा व्यक्ती आणि त्याच्या घर/कार्यस्थळाचे कंपन तरंग विश्व शक्तीच्या कंपन तरंगाच्या (जसे 9) संपर्कात येतात त्यानंतर लगेचच विश्व शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात आणि घरात संचालित होते. याचा परिणाम असा होतो, शरीरातील अब्जावधी पेशींना जेव्हा गरज असते तेव्हा त्यांना विश्व शक्तीचा पुरवठा होतो.

दुस-या शब्दात जेव्हा विश्व शक्ती व्यक्तीच्या शरीरात संचालित होते तेव्हा विश्व शक्तीचा शरीरातील अब्जावधी पेशींना पुरवठा होतो आणि ती शरीरातील पेशी आणि अवयवांना अधिकाधिक उर्जान्वित आणि क्रियाशील बनवते.

याचा परिणाम म्हणून व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 9 ते 180 दिवसात सकारात्मक बदलांचा अनुभव करू लागतो.

एकदा विश्व शक्तीशी संपर्क साधला की विश्व शक्ती अशा काही प्रकारे सकारात्मक परिणाम द्यायला सुरुवात करते की:

  1. रक्तदाब सामान्य पातळीवर येईल आणि अहवालही हेच दर्शवतील
  2. व्यक्तीच्या एकूणच आरोग्यात काही महिन्यातच सुधारणा जाणवतील आणि तिथे कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत.
  3. रोग नसल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
मानव गुरू

मानव गुरू

आपल्या दिव्य ज्ञानाच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या आयुष्यात 9 ते 180 दिवसात परिवर्तन घडवून आणले आहे.

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube
Get Vastu Prediction

Thank you!

Your details have been submitted successfully. Our team will contact you soon.